आमचे ध्येय
बळकट पंचायतराज व्यवस्थेमार्फत पुर्णत्ववादी, सर्व समावेशक आणि चिरस्थायी ग्रामविकास साधणे.
कार्यदृष्टी्
- सामाजिक व मुलभूत सार्वजनिक सुविधांची यथार्थ उपलब्धलता, दारिद्रय निमुर्लन केंद्रीभूत मानून सामजिक, आर्थिक व राजकीय संधीचा उपयोग
- व्यवस्थापनाच्या त्रिसुत्री - निधी, कार्य व अधिकारी यासाठी पंचायतराज संस्थांचे सक्षमीकरण
- नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन व नियंत्रण यासाठी पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण
- शासनाचे इतर विभाग, निमशासकीय संस्थात, स्वंयसेवी संस्था व इतर यांच्या विकास संबंधीच्या योजना, कार्यक्रम व कार्याचा समुह कृती संगम
- एकत्रित निर्णय, कृती व तक्रार निवारण यासाठी ग्रामसभा, स्वंवय सहाय्यता गट, सामाजिक लेखापरिक्षण व तंत्रज्ञान याद्वारे एकत्रिकरणास प्रोत्साहन
उद्देश
- स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजने अंतर्गत ग्रामीण महाराष्ट्रातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना उपजिवीकेच्या संधी उपलब्ध करुन दारिद्रय उपशमन करणे
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे
- इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे
- पर्यावरण संतुलित मूलभूत सुविधांद्वारे स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे
- प्रशिक्षणतून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायतराज व्यवस्था बळकट करणे
- तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी मूलभुत सुविधा व साधने पुरविणे
- ई-पंचायत, प्रशासकीय सुधारणा, संगणकीय कारभार
- मागास क्षेत्र अनुदान निधी प्रकल्पांतर्गत येणा-या जिल्ह्यांमधील मूलभूत सुविधा व साधनांमधील गंभीर त्रुटी भरुन काढणे
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविणे
- प्रशासकीय पारदर्शकतेसाठी ऑनलाईन बदल्या, सेवा पुस्तकांचे संगणीकृत अद्ययावती करण पध्दत इत्यादीचा अवलंब करणे